गाव दत्तक कार्यक्रम

जीवन समस्या मुक्ति ग्राम अभियान (JSMGA) हा एक मोठ्या प्रमाणावर उच्च परिणामकारक सामाजिक उपक्रम आहे. ज्याची कल्पना आणि सुरुवात गुरुजींनी मानवजातीच्या कल्याणासाठी केली आहे. ‘जीवन समस्या मुक्ति ग्राम अभियान’, अंतर्गत गुरुजींनी गाव दत्तक कार्यक्रम सुरू केला आहे, जिथे गावातील प्रत्येक घरात सरळ वास्तुची सेवा देण्यात येते.

(JSMGA) चा हेतू “मानव अभिवृद्धी” हा आहे आणि लोकांमध्ये आणि समाजात मोठ्या प्रमाणात याची जागरूकता वाढविणे हा आहे. हे संपूर्ण गावकऱ्यांच्या जीवनाच्या विविध टप्प्यात जसे शिक्षण, नोकरी नातेसंबंध, व्यवसाय, संपत्ती आणि आरोग्य तसेच त्यांच्या संपूर्ण राहणीमानाचा दर्जा सुधारण्यासाठी मदत करते.

भारत सरकारचे शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे लक्ष्य आहे. हे लक्ष्य साध्य करण्याचे धोरण म्हणून, शासनाने वेगवेगळ्या भागात शेती बद्दल माहिती आणि बाजारपेठेवर मोठ्या प्रमाणात आर्थिक मदतीची वाटप केली आहे. सरकारचे सर्व हेतू योग्य असूनही शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या वाढत्या प्रमाणामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेत आर्थिक तणाव वाढत आहे.

वंचितांसाठी शिक्षण

शिक्षण समस्या मुक्त ग्राम अभियान (SSMGA) हा एक मोठ्या प्रमाणावर उच्च परिणामकारक सामाजिक उपक्रम आहे. ज्याची कल्पना आणि सुरुवात मानवजातीच्या कल्याणासाठी गुरुजींनी केली आहे. SSMGA च्याअंतर्गत, वंचित मुलांच्या प्रगतीच्या उद्देशाने गुरुजींनी ग्रामीण भागात साक्षरता आणि प्राथमिक शिक्षण देण्यासाठी स्थापित केले आहे. मानवी अभिवृद्धी अभियानाअंतर्गत वंचितांना मूलभूत शिक्षणच नाही तर सरळ वास्तु देऊन त्यांचे जीवन समृद्ध करून सक्षम बनवण्याचा प्रयत्न करतो.

अशाप्रकारे मुलांना त्यांचे घर,वसतिगृहामध्ये ब्रह्मांडीय उर्जाची उपस्थिती जाणवेल आणि अशा सर्वव्यापी ऊर्जेच्या संपर्कात येऊन तिचे संतुलन बनवून तिला चैनलाईझ करून त्यांची पूर्ण क्षमता प्राप्त कशी करावी हे शिकण्यास सक्षम होतील. ते केवळ साक्षरता आणि प्राथमिक शिक्षणच मिळवणार नाहीत तर त्यांच्या जवळ आणि आसपासच्या ब्रह्मांडीय उर्जा मुक्त करून त्यांच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यास किंवा एक चित्त करण्यास सक्षम होतील. या शिक्षण समस्या मुक्त ग्राम अभियानात मोठ्या प्रमाणात शैक्षणिक पुढाकार घेऊन गुरुजींना हातभार लावा.

सामूहिक विवाह

समुहिक विवाह किंवा विवाह मेळावा हा एक उपक्रम डॉ. श्री. चंद्रशेखरज गुरुजींनी हाती घेतला आहे. हा उपक्रम वंचितांना सन्मानपूर्वक लग्न करण्यास सक्षम करते. आपल्या समाजातील वंचित गटातील काही लोकांना लग्न करण्यास आव्हानांचा सामना करावा लागतो. या वधू-वरांचे सामूहिक विवाह आयोजित करण्यासाठी देशाच्या विविध भागात जिल्हा पातळीवर कार्यक्रम आयोजित केले जातात. अशाप्रकारे समुहिक विवाह वंचित लोकांना लग्न करण्यास आणि आनंदी आणि सन्माननीय जीवन जगण्यास सक्षम करते.